मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या बांधकामामध्ये स्टेनलेस स्टिलचा वापर केला असता तर तो पुतळा कोसळला नसता- नितीन गडकरी.

सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील मालवणातील राजकोट किल्ल्यावर डिसेंबर महिन्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अनावरण झालेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा 26 ऑगस्ट रोजी कोसळला.या विषयावरुन राज्यातील राजकारण तापलं आहे. अगदी पंतप्रधान मोदींपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी या प्रकरणी जनतेची माफी मागत भव्यदिव्य स्मारक उभारण्याचं आश्वासन दिलं आहे.आता या प्रकरणी बोलताना राज्यातील भाजपाचे ज्येष्ठ नेते तसेच केंद्रीय रस्ते वाहतूक आणि दळवळण मंत्री नितीन गडकरींनी एक महत्त्वाचं विधान केलं आहे. सदर पुतळा उभारताना स्टेनलेस स्टिलचा वापर करायला हवा होता, असं गडकरी म्हणाले आहेत. हे विधान करताना गडकरींनी समुद्र किनाऱ्यावरील खाऱ्या वाऱ्यांमध्ये स्टेनलेस स्टिल अधिक परिणामकारक ठरलं असतं असा संदर्भ दिला. दिल्लीमधील एका कार्यक्रमात गडकरी बोलत होते.नितीन गडकरींनी स्टेनलेस स्टिलचं महत्त्व अधोरेखित करताना आपल्या मंत्रालयाअंतर्गत त्याचा समुद्रकिनाऱ्यावरील बांधकामासाठी अधिक वापर करण्याचा प्रयत्न असल्याचं म्हटलं आहे. “मागील तीन वर्षांपासून समुद्रकिनाऱ्यावर उभारण्यात येणत असलेल्या रस्त्यांबरोबर त्यावरील पुलांसाठी स्टेनलेस स्टिलचा वापर करण्याचा माझा प्रयत्न आहे,” असं गडकरींनी सांगितलं.स्टेनलेस स्टिलच्या वापर झाला असता तर पुतळा कोसळला नसता असंही नमूद केलं. “जर मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या बांधकामामध्ये स्टेनलेस स्टिलचा वापर केला असता तर तो पुतळा कोसळला नसता,” असं गडकरी जुन्या गोष्टीशी काही दिवसांपूर्वी घडलेल्या दुर्घटनेशी जोड देत म्हटलं.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button