
पोलीस भरतीत डमी उमेदवार देऊन यंत्रणेची फसवणुक टाळण्यासाठी प्रथमच बायोमेट्रीक फेस (चेहरा) स्कॅन यंत्रणा वापरली जाणार
रत्नागिरी जिल्हा पोलिस दलातील रिक्त पदांसाठी बुधवारी (ता. १९) पासून पोलिस भरती प्रक्रिया होणार आहे. १४९ पदांसाठी ८ हजार ७१३ उमेदवारी अर्ज प्राप्त झाले आहे. भरती प्रक्रिया अतिशय़ पारदर्शक होणार आहे. कोणाच्याही प्रलोभणाला बळी पडुन नका. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पथके नेमण्यात आली आहेत. डमी उमेदवार देऊन यंत्रणेची फसवणुक टाळण्यासाठी प्रथमच बायोमेट्रीक फेस (चेहरा) स्कॅन यंत्रणा वापरील जाणार आहे, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी दिली.www.konkantoday.com