
चिपळूण शहरातील वाढत्या अतिक्रमणामुळे नागरिक त्रस्त, वाहतुकीची सतत कोंडी
गेल्या काही दिवसांपासून चिपळूण शहरातील अतिक्रमणात पुन्हा मोठी वाढ झाली आहे. या वाढत्या अतिक्रमणामुळे शहरातून चालणेही कठीण बनले आहे. यामुळे वारंवार निर्माण होणार्या वाहतूक कोंडीचा प्रश्नही गंभीर बनला आहे. त्यामुळे चिपळूण नगर परिषदेने हे अतिक्रमण हटवण्याची मागणी होत आहे.काही महिने मागे जाता शहरातील गटारे साफ करताना नगर परिषदेने त्यावरील व अन्य अतिक्रमणावर कारवाई केली होती. त्यामुळे शहर जरा मोकळे दिसत होते. मात्र आता पुन्हा अतिक्रमण वाढले असून यामुळे रस्त्यावरून चालणेही कठीण बनले आहे.www.konkantoday.com