राजापुरातून आंब्याची पहिली पेटी मार्केटमध्ये रवाना*

  • राजापूर तालुक्याती भू येथील युवा बागायतदार विशाल सरफरे यांच्या बागेमधून हापूस आंब्याची पहिली पेटी मुंबई आणि गुजरात येथील अहमदाबाद बाजारपेठेमध्ये रवाना झाल्या आहेत.यावर्षी अपेक्षेपेक्षा थंडीचे कमी प्रमाण आणि अवकाळी पाऊस अशा प्रतिकूल परिस्थितीतही योग्य व त्या उपाययोजना केल्याने जानेवारीतच पहिली पेटी मार्केटमध्ये रवाना झाल्याचे विशार सरफरे यांनी सांगितले. यावर्षी हंगामाच्या सुरूवातीला थंडीचे अपेक्षित वातावरण नव्हते. त्याचा सुरूवातीला आंब्याच्या मोहोर येण्यावर परिणाम झाला. त्यानंतर सातत्याने पडलेल्या अवकाळी पावसाचाही आंबा हंगामाला फटका बसला. तर काही बागांमध्ये बुरशीचा प्रादुुर्भाव होवून नुकसान झाले. त्यामुळे झालेली फळधारणा टिकविण्यासाठी आणि बुरशी प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सरफरे यांनी बुरशीनाशक औषधांची सातत्याने फवारणी केली. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button