गेली २४ वर्षाची रत्नागिरी जिल्हा मोटर मालक संघाची दहीहंडीपरंपरा कायम:- उदय सामंत

रत्नागिरी येथील रत्नागिरी जिल्हा मोटर मालक संघ यांच्या वतीने गेली २४ वर्षे दहीहंडीचा उत्सव साजरा केला जातोय. त्या कार्यक्रमाला पालकमंत्री उदय सामंत गेली अनेक वर्ष आवर्जून उपस्थित राहत असतात त्याच प्रमाणे यावर्षी पालकमंत्री उदय सामंत यांनी उपस्थित राहून सर्वांना शुभेच्छा दिल्या. यावेळी पालकमंत्री उदय सामंत यांनी मार्गदर्शन केले ते म्हणाले,गेली २४ वर्षाची रत्नागिरी जिल्हा मोटर मालक संघाची परंपरा कायम ठेवली त्याबद्दल सर्व सदस्य आणि पदाधिकारी यांचे अभिनंदन करतोय.दहीहंडी सारखा खेळ खेळण्यासाठी धाडस लागत आणि ते धाडस रत्नागिरी मधील खेळाडूंमध्ये आहेत यांचा मला अभिमान आहे. यावेळी कार्यक्रमाला विकास धाडस, दिनेश सावंत, माजी नगरसेवक वसंत पाटील, रत्नागिरी जिल्हा मोटर मालक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button