
आरजीपीपीएलमधून १३०० मेगावॅट वीज निर्मिती
गॅसच्या वाढलेल्या किंमती आणि विजेची मागणी नसल्याने बंद पडलेला गुहागर तालुक्यातील रत्नागिरी गॅस आणि वीज प्रकल्प (आधीचा दाभोळ) पुन्हा कार्यान्वित करण्यासाठी पाठपुरावा सुरू होता. परंतु राज्य किंवा केंद्र सरकारकडून अद्यापही म्हणावा तसा प्रतिसाद मिळालेला नाही. दरम्यान, येथील प्रकल्प व्यवस्थापन विजेच्या मागणीनुसार वीज निर्मिती करीत आहे. गेले काही दिवस प्रकल्पातून दोन टप्प्यात १३०० आणि ४०० मेगावॅट वीजनिर्मिती सुरू आहे.www.konkantoday.com