कोल्हापूर खंडपीठासाठी मुख्य न्यायाधीशांसोबत लवकरच बैठक

मुंबई उच्च न्यायालयाचे कोल्हापूर खंडपीठाचे स्वप्न साकार होण्यासाठी आपण मुख्य न्यायाधीश यांच्याकडे एकत्रित बैठक घेण्यासंदर्भात वेळ मागितला आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. या प्रश्‍नासंदर्भात कृती समितीतर्फे मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले.मुख्यमंत्री बुधवारी रत्नागिरी दौर्‍यावर होते. त्या दौरा कार्यक्रमात कोल्हापूर खंडपीठासंबंधी शासन सकारात्मक असून विषय मार्गी लागेल असे स्पष्ट आश्‍वासन मुख्यमंत्री यांनी शिष्टमंडळाला दिले. यावेळी उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत हजर होते.शिष्टमंडळात रत्नागिरी बारचे अध्यक्ष व कृती समितीचे सदस्य ऍड. विलास पाटणे, ऍड. अशोक कदम, ऍड. विजय साखळकर, उपाध्यत्र ऍड. शाल्मली आंबुलकर, सचिव ऍड. रत्नदीप चाचले सहभागी होते.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button