
महायुतीतील नेत्यांनी बोलताना तारतम्य ठेवावे, शिवसेना नेते किरण उर्फ भैय्या सामंत यांचा सल्ला
आज आगामी विधानभेच्या निवडणुकीसाठी आपल्याच पक्षाला उमेदवारी प्रत्येकजण मागतोय असं न करता महायुती जो उमेदवार देईल, त्याला निवडून आणेन असे म्हटले पाहिजे. तरच आपल्या महायुतीत मतभेद, वाकडीक येणार नाही. त्यासाठी काही लोक भाषण करतात, महत्वाचे पक्ष आहेत. त्यांनी बोलताना तारतम्य बाळगले पाहिजे. असा टोला शिवसेनेचे नेते तथा उद्योजक किरण सामंत यांनी बोलताना लगावला आहे.सामंत यांनी गेल्या वर्षभरापासून राजापूर-लांजा -संगमेश्वर या विधानसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रीत केले आहे. मतदारसंघातील शिवसेनेच्या अधिक बांधणीसाठी येथील शिवसैनिकांना नवचैतन्य देण्यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील आहेत. राजापूर मतदार संघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मागील काळात शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर या मतदारसंघात दोन गट पडले. पण या मतदारसंघात आपण शिवसेनेचा प्रचार करण्यासाठी फिरत असलो तरी येथे महायुतीचा जो उमेदवार असेल त्याला निवडून आणण्यासाठी निश्चित प्रयत्न करणार असल्याचे सामंत यांनी सांगितले. www.konkantoday.com