
प्रकल्पांच्या माध्यमातूनच शासन अस्थिरता व असुरक्षितता निर्माण करत-सौ. हुस्नबानू खलिफे
राजापूर तालुक्यातील नाणार व सागवे हमदरा घोडपोईवाडी बॉक्साईट उत्खनन प्रकल्पाबाबत स्थानिक जनता व शेतकर्यांना हा प्रकल्प म्हणजे नेमके काय आहे याबाबतच्या वस्तुस्थितीची माहिती होणे आवश्यक आहे. त्यानंतरच जनसुनावणी घेणे योग्य ठरेल, असे मत कॉंग्रेसच्या माजी आमदार ऍड. सौ. हुस्नबानू खलिफे यांनी व्यक्त केले आहे.राजापुरात अशा प्रकारे अनेक प्रकल्पांच्या माध्यमातूनच शासन अस्थिरता व असुरक्षितता निर्माण करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. राजापूर तालुक्यात नाणार व सागवे हमदरा घोडेपईवाडी प्रस्तावित असलेल्या बॉक्साईट उत्खनन प्रकल्पांच्या जनसुनावणीला उद्योगमंत्री उदय सामंत यांनी अनिश्चित काळासाठी स्थगिती दिली आहे. या पार्श्वभूमीवर माजी आमदार ऍड. सौ. खलिफे यांनी बोलताना सांगितले की, त्यांनी या प्रकल्पाबाबत जनतला तेथील शेतकर्यांना आधी या प्रकल्पाबाबत योग्य माहिती देणे आवश्यक आहे. नेमका हा प्रकल्प आहे काय? किती प्रमाणात या ठिकाणी बॉक्साईट आहे? किती शेतकर्यांच्या जमिनीत ते आहे याचा शेतकरी व स्थानिकांना काय फायदा आहे याबाबत माहिती देणे आवश्यक आहे. www.konkantoday.com