
ठाकरेंना संपवायला निघालेल्यांचा नामोनिशाणही ठेवणार नाही-उद्धव ठाकरे
राज्यातून ठाकरे ब्रँड संपवण्याचा प्रयत्न केला जात आहे, पण तो संपणार नाही.
ठाकरेंना संपवायला निघालेल्यांचा नामोनिशाणही ठेवणार नाही असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला.
कम ऑन किल मी…हा नाना पाटेकरांच्या प्रहार चित्रपटातील डॉयलॉग मारत उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे आणि भाजपला जाहीर आव्हान दिलं. मुंबई यांच्या मालकाच्या घशात घालण्यासाठी भाजप मराठी माणसाला एकत्र येऊ देत नाही. पण राज्याच्या मनात जे आहे तेच मी करणार असं सांगत उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंच्या मनसेसोबत युतीचे संकेत दिले.शिवसेना अजूनही तरुण आहे अजून ही तरुणच राहणार आहे. तिकडे चोरांचा बाजार भरला होता. पहिल्या मेळाव्याच्या वेळी बाळासाहेब यांनी शिवाजी पार्कत मेळावा घेतला होता. त्यावेळी मी माझ्या माँच्या मांडीवर बसलो होतो. राजकारणात ज्यांना पोरं होतं नाहीत ते आमच्यावर टीका करतात. तुला पोर होत नाहीत त्याला आम्ही काय करू? किती पाहिजे आहेत तेवढी पोर घे. भाजपला स्वतःची पोरं नाहीत त्यामुळे त्यांना अशी घ्यावी लागतात. ते आपल्याला हिंदुत्व शिकवत आहेत. ज्या वल्लभ भाई पटेल यांनी भाजपवर बंदी आणली त्यांचाच पुतळा सरदार वल्लभ भाई पटेल यांचा पुतळा बांधण्याची वेळ आलीएवढी माणसं चोरली, पक्ष चोरला, वडील चोरले तरी उद्धव ठाकरे संपत कसा नाही? असा प्रश्न त्यांना पडला असेल. पण शिवसैनिकांनी रक्त आटवून ही शिवसेना उभारली आहे. पैसे फेकून नव्हे तर कष्ट करून ही संपत्ती जमवली आहे. दुसरीकडे चोरांचा बाजार सुरू आहे.उंची पेग्विनची, चाल बदकाची आणि आवाज कोंबडीचा, डोळे कुणासारखे ते माहिती नाही. अरे तुझा जीव किती, तू बोलतो किती? तुझ्या वडिलांची पार्श्वभूमी काय? एक कुणीतरी बाप ठरवं आणि मग बोल असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी भाजपचे आमदार नितेश राणे यांच्यावर टीका केली.