आमचं सरकार येईल तेव्हा पंधराशे ऐवजी आम्ही 3000 रुपये देऊ हा आमचा शब्द- संजय राऊत
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा महायुतीवर जोरदार हल्लाबोल केला आहे. सरकारकडून राज्यात मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना लागू करण्यात आली आहे, ही सरकारची एक महत्त्वकांक्षी योजना आहे.या योजनेवरून संजय राऊत यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.लाडकी बहीण योजना निवडणुकीचा टर्निंग पॉइंट ठरणार का? असा प्रश्न विचार असता त्यांनी जोरदार हल्लाबोल केला. ‘ अजिबात नाही कदाचित तो न्यूटन ठरेल त्यांच्यासाठी टर्निंग पॉईंट असं काही नाही, अशा प्रकारच्या खूप योजना महाराष्ट्र सरकारने राबवलेल्या आहेत. ती काय नवीन योजना नाही, त्यांनी काय फार मोठी क्रांती केली नाही. महिलांसाठी अशा अनेक योजना यापूर्वी आलेल्या आहेत. ते दीड हजार रुपये काही खिशातले देत नाहीत, तो लोकांचा पैसा आहे. या योजनेचा लाभ महिलांनी घेतला पाहिजे. आमचं सरकार येईल तेव्हा पंधराशे ऐवजी आम्ही 3000 रुपये देऊ हा आमचा शब्द आहे,’ असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.