मुंबईकरांनो आता वर्षभर पाण्याचे नो टेन्शन! मुसळधार पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणारे पाच तलाव भरले!!

सध्या संपूर्ण राज्यात पावसाची तुफान बॅटिंग सुरु आहे. तर गेल्या काही दिवसांपासून मुंबईत मुसळधार पाऊस पाहायला मिळत आहे.*मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणक्षेत्रातही चांगला पाऊस होताना दिसत आहे. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे मुंबईतील अनेक धरण ओव्हरफ्लो होताना दिसत आहे. त्यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. आता मुंबईकरांसाठी आणखी एक गुडन्यूज समोर आली आहे. मुंबईतील पाचवा तलाव ओव्हर फ्लो झाला आहे. तर बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या सात जलाशयांपैकी ‘हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा जलाशय’ आज मध्यरात्री २ वाजून ४५ मिनिटांनी पूर्ण भरले आहे. ज्यानंतर तलावाचे दोन दरवाजे उघडण्यात आले असून ७०६.३० क्युसेक या वेगाने जलविसर्ग सुरू आहे.यंदाच्या उन्हाळ्यात मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या बहुतांश तलावांनी तळ गाठला होता. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेने १० टक्के पाणी कपातीचा निर्णय घेतला होता. जून महिन्यात समाधानकारक पाऊस न पडल्यामुळे मुंबईकरांची पाण्याची चिंता कायम होती. जुलै महिन्यात अनेक दिवस मुसळधार पाऊस झाल्याने तलावांमधील पाणीपातळी झपाट्याने वाढत आहे. काही दिवसांपूर्वीच मुंबईतील पवई तलाव भरला होता. त्यानंतर आता तुळशी तलाव भरल्याने मुंबईकरांसाठी ही दिलासादायक बाब म्हणावी लागेल.गेल्याच महिन्यात तुळशी, विहार, मोडक सागर, तानसा हे तलाव ओसंडून वाहू लागले होते. त्यापाठोपाठ आज ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा जलाशय’ देखील पूर्ण भरले आहे. यानुसार यंदाच्या पावसाळ्यात बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ तलावांपैकी ५ तलाव आतापर्यंत पूर्ण क्षमतेने भरले आहेत. मागील काही दिवसांमध्ये पाणलोट क्षेत्रात सातत्याने होत असलेल्या दमदार पावसामुळे जलाशयांची पाणी पातळी झपाट्याने वाढली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या या 7 धरणांची एकूण कमाल पाणी साठवण क्षमता ही १,४४,७३६.३ कोटी लीटर (१४,४७,३६३ दशलक्ष लीटर) इतकी आहे. सध्या सर्व ७ तलावांमध्ये मिळून ८९.१० टक्के इतका जलसाठा आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button