रत्नागिरी शहरातील किर्तीनगर येथे मित्रानेच लांबवले साडेसात लाख रुपये

रत्नागिरी शहरातील किर्तीनगर येथे भाड्याने वास्तव्य करत असलेल्या सहकारी मित्राने 7 लाख 50 हजार रुपये चाेरुन नेल्याचा प्रकार समाेर आला आहे. ही घटना 1 जून राेजी सकाळी 5 ते 10.30 वाजण्याच्या दरम्यान घडली. आलम समसाद ’खान (27, रा. किर्तीनगर रत्नागिरी) यांनी या प्रकरणी शहर पाेलिसात तक्रार दाखल केली असून त्यानुसार पाेलिसांनी त्याच्या संशयित मित्राविरुद्ध गुन्हा दाखल केला. प्रदीपसिंह मलखासिंह यादव (रा. किर्तीनगर, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे. माेहम्मद खान व प्रदीपसिंह यादव हे किर्तीनगर येथे भाड्याची खाेली घेऊन वास्तव्य करत हाेते. 1 जून राेजी प्रदीपसिंह हा 7 लाख 50 हजार रुपयांची राेकड असलेली बॅग घेऊन निघून गेला, अशी तक्रार माेहम्मद खान याने शहर पाेलिसात दिली आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button