
राजकारणातील माणसे षंड आहेत, असे आपण म्हणालात. आपण आत्मपरीक्षण करा, षंढ शब्दाचा अर्थ कोणाशी जवळीक साधतो?- नारायण राणे यांची उद्धव ठाकरेंवर टीका
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेली टीका भाजपच्या जिव्हारी लागली आहे. त्यामुळे भाजपचे ज्येष्ठ नेते तथा रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे यांनी अतिशय तिखट शब्दांत उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर दिलं आहे.उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांना चॅलेंज देण्याचा औकात नाही, अशी खोचक टीका नारायण राणे यांनी केली आहे. नारायण राणे एवढ्यावर थांबले नाहीत. तर उद्धव ठाकरे तुम्ही वाकड्यात शिरला तर तुम्हाला तसंच उत्तर दिलं जाईल, असा इशारा नारायण राणे यांनी दिला. तसेच आपले मुख्यमंत्रीपद हे महाराष्ट्रासाठी कलंक होते. आपल्या कारकीर्दीत महाराष्ट्र 10 वर्षे मागे गेला, असा दावा नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांना उद्देशून केला. तसेच मातोश्रीत बसून धमकीची भाषा षंढच करू शकतो, असा घणाघातही नारायण राणे यांनी केला.’उद्धव ठाकरे यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चॅलेंज देण्याची औकात आणि लायकी नाही. लोकशाहीमध्ये निवडणुकीत जागा कमी-जास्त होतात. भाजपने काही पहिल्यांदा निवडणूक लढलेली नाही. नरेंद्र मोदी अनेक निवडणुकांना सामोरे गेलेले आहेत. त्यामुळे त्यांना घाम फुटण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. नरेंद्र मोदी यांच्याबद्दल हे वाक्य उदगारताना जनाची नाही तर मनाची तरी ठेवावी’, अशा शब्दांत नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर दिलं.’उद्धव वाकड्यात शिरले तर वाकडे पणाला चोख उत्तर देवून भाजप सरळ केल्याशिवाय राहणार नाही. राजकारणातील माणसे षंड आहेत, असे आपण म्हणालात. आपण आत्मपरीक्षण करा, षंढ शब्दाचा अर्थ कोणाशी जवळीक साधतो? आपले मुख्यमंत्री पद हे महाराष्ट्रासाठी कलंक होते. आपल्या अडीच वर्षाच्या कालावधीत विकासाच्या बाबतीत महाराष्ट्र १० वर्ष मागे गेला तेव्हा लोक म्हणायचे अडीच वर्षात दोनदा मंत्रालयात जाणाऱ्या मुख्यमंत्र्याची कीव करावीशी वाटते’, असा दावा नारायण राणे यांनी केला.