चक्रीवादळामुळे विस्कळीत झालेला पोचरी येथील विद्युत पुरवठा सुरळीत

चक्रीवादळामुळे संगमेश्‍वर तालुक्यातील पोचरी गावात लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. पोल वाकल्याने विद्युत पुरवठा खंडित झाला होता. मात्र कर्मचार्‍यांनी मेहनत घेवून विद्युत पुरवठा सुरळीत सुरू केला आहे. संगमेश्‍वर तालुक्यातील पोचरी गावात रविवारी झालेल्या चक्रीवादळामुळे ४ लाख ३० हजार रुपयांचे नुकसान झाले होते. तसेच ३ पोल पडल्याने विद्युत पुरवठा खंडित झाला होता. रविवारपासून काम सुरू करण्यात आले होते. मंगळवारी हा विद्युत पुरवठा पुन्हा सुरळीत सुरू झाला आहे. तसेच या ठिकाणी रस्त्यावर पडलेला वृक्ष हटवण्यात आला असून रस्तेही सुरळीत सुरू झाले आहेत.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button