सीसीटीव्हीमुळे मिळतेय अचूक पाणीपातळी

चिपळूण नगर परिषदेने शहरातील वाशिष्ठी व शिवनदी काठावर दोन सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. यामुळे पाण्याची अचूक पातळी समजत असून यामुळे नागरिकांना सतर्क करणे शक्य होत आहे. या कॅमेर्‍याचे नियंत्रण नगर परिषदेत असल्याने कार्यालयात बसून पाणीपातळीची नोंद करता येत आहे.शहरात पुराचे पाणी कधी येईल, हे वाशिष्ठी व शिवनदीच्या पाणीपातळीवरून ठरवले जाते. येथील पाणीपातळी लक्षात घेवूनच नागरिकांना भोंगे वाजवून सतर्क केले जाते. वाशिष्ठीची इशारा पातळी ५ मीटर तर धोकापातळी ७ मीटरची निश्‍चित करण्यात आली आहे. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button