संगमेश्‍वर तालुक्यातील माभळेत जमिनीला भेगा अतिवृष्टीमुळे भूस्खलन होण्याची भीती

अतिवृष्टीमुळे संगमेश्‍वर तालुक्यातील माभळे येथे रस्त्यासह जमिनीला १०० मी. अंतरापर्यंत मोठ्या भेगा पडल्या असून रस्ता खचला आहे. डोंगरावरील माती कधीही सरकण्याची भीती निर्माण झाली असून मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाल्यास धोका होण्याची भीती व्यक्त होत आहे.अतिवृष्टीमुळे भूस्खलन होण्याचे प्रकार अनेक ठिकाणी घडत असून असाच एक प्रकार संगमेश्‍वर तालुक्यातील मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील माभळेतील काष्टेवाडी येथे झाला. रस्त्याला मोठ्या प्रमाणात भेगा पडल्या आहेत. त्यामुळे पुढील गावांसाठी या रस्त्यावरून होणार्‍या वाहतुकीला धोका असून दिवसभरात भेगा वाढत असून त्या रूंदावल्या जात असल्याने भूस्खलन होण्याची शक्यता नाकारता येणार नसल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेले काही दिवस सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे माभळे काष्टेवाडी वस्तीपासून काही अंतरावर रस्त्याला काही ठिकाणी भेगा पडण्याच्या घटना घडत आहेत. काही ठिकाणी रस्त्याचा भाग खचला असून खचलेला हा भाग ७ फुटापर्यंत सरकला आहे. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button