घराच्या वादावरून कुटुंबाला चौघांकडून मारहाण

_रत्नागिरी तालुक्यातील करबुडे येथे तोंडी करार करुन घर खरेदीच्या एकूण रकमेपैकी पन्नास हजार देऊन घरात वास्तव्य करणाऱ्या कुंटुंबाला चारजणांनी शिवीगाळ करुन मारहाण केली. संशयितांविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मनोहर भगवान जाधव, मनोहर जाधव यांची पत्नी, प्रतिक मनोहर जाधव आणि अन्य एक अज्ञात (सर्व रा. करबुडे धनावडेवाडी, रत्नागिरी) अशी संशयितांची नावे आहेत. ही घटना गुरुवारी (ता. २५) दुपारी एकच्या सुमारास करबुडे येथे घडली.पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी अभिषेक सहदेव पवार (रा.करबुडे धनावडे,रत्नागिरी) यांनी संशयित यांच्यात घर विकत घेण्याबाबत तोंडी करार झाला होता. त्यातील एकूण रकमेपैकी ५० हजार रुपये पवार यांनी संशयितांना दिले होते. त्यानंतर एक महिन्यापूर्वी ते आपल्या कुटुंबासह त्या घरात रहाण्यासाठी आले होते.गुरुवारी चार संशयितांनी त्या घरी येवून तू आताचे आता घर खाली कर असे बोलत अभिषेक पवार आणि त्यांच्या कुटुंबासह वाद घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर मनोहर जाधवने अभिषेक पवार यांच्या डोक्यात लोखंडी पक्कडीने कानावर मारुन दुखापत केली. त्यावेळी फिर्यादीची आई आणि पत्नी त्यांचा वाद सोडवण्यासाठी मध्ये पडल्या असता संशयिताने त्यांना पक्कड आणि घरातील पाळणा उगारुन मारहाण केली. त्यानंतर सर्व संशयितांनी फिर्यादी आणि त्यांच्या कुटुंबाला शिवीगाळ करत ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी अभिषेक पवार यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button