अकरावी प्रवेशासाठी जास्त जागा उपलब्ध झाल्यामुळे विद्यार्थ्याना सहज प्रवेश उपलब्ध

जिल्ह्यात इयत्ता १० वीच्या परीक्षेत १७ हजार ७८६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले तर ११ वी प्रवेशासाठी २७ हजार ४२० एवढ्या जागा उपलब्ध असल्याने यावर्षी प्रवेशाची अडचण जाणवली नाही. स्वयं अर्थसहाय्य कनिष्ठ महाविद्यालय अधिकाधिक संख्येने पुढे आल्यामुळे प्रवेश क्षमतेत वाढ झाली व प्रवेश मिळविण्याचा प्रश्‍न मार्गी लागला, अशी माहिती जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागाच्या अधिकृत सूत्रांनी दिली आहे.रत्नागिरी जिल्ह्यात अनुदानित स्वरूपाच्या ६१ शाळा असून त्यांच्याकडे ९,९६० विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची क्षमता आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button