महाराष्ट्रातलं सरकार हे शेठजी आणि भटजीचं सरकार’-अखिल भारतीय निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव

_महाराष्ट्रातलं सरकार हे शेठजी आणि भटजीचं सरकार आहे. शेठजीची संपत्ती वाढवणारं आणि गरिबांना गरीब बनवणारं हे सरकार आहे अशी टीका सामाजिक कार्यकर्ते आणि अखिल भारतीय निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव यांनी म्हटलं आहे.महाराष्ट्रातलं हे सरकार कसं आलं ते सगळ्यांना माहीत आहे. सरळपणे एवढे खोके घ्या, मंत्रिपदं घ्या, तुमचा पक्ष फोडा आणि आमच्याकडे या नाहीतर तुरुंगात जा. या पद्धतीने हे सरकार आलं आहे. गुवाहाटीतून परत आलेल्या माझ्या मित्राला मी सांगितलं. माझ्या त्या मित्राला मी म्हटलं की पाच दहा लोकं ईडी-सीबीआयच्या भीतीने फुटले असतील. तर तो मला म्हणाला तुम्हाला ठाऊक नाही ४० च्या ४० आमदारांची कागदपत्रं तयार आहेत. अशा पद्धतीने फोडाफोडी करुन हे सरकार आलं. मी त्या मित्राला हे पण म्हटलं की असं जर त्यांनी केलं तर त्यांच्यावर कोर्टाची कारवाई होईल. त्यावर तो मित्र मला म्हणाला सगळे निर्णय त्यांच्या बाजूने येणार आणि सरकार अडीच वर्षे चालणार हे आधीच ठरलं आहे.” असंश्याम मानव त्यांच्या भाषणात म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button