निरखुणे (चिंद्रवली) येथिल रस्ता वाहुन गेल्याने गावकऱ्यांना करावी लागत आहे पायपीट
सततच्या मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे निरखुणे (चिंद्रवली) येथिल रस्ता वाहुन गेल्याने गावातील वाहतूक बंद झाली आहे गावकऱ्याना गरजेच्या वस्तू म्हणजे किराणा, भाजीपाला, कामावर जाण्या साठी तसेच शेती कामा साठी भर पावसात पायी तासभर चालून चांदेराई बाजारपेठेत जावे लागते. ग्रामपंचायत रेल्वे प्रशासनानेही गावकऱ्याकडे दुर्लक्ष केले असून गावकऱ्यांची समस्या अजूनही कायमच आहे संबंधितांनी याबाबत तातडीने लक्ष घालावी अशी गावकऱ्यांची मागणी आहे*