
त्यामुळे संजय राउतांच्या वक्तव्याला फार काही महत्व देऊ नका-काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले
उद्धव ठाकरे हे इंडिया आघाडीत पंतप्रधान का असू शकत नाहीत? याचा निर्णय इंडिया आघाडीत बसून घेतला जाईल. पंतप्रधान पदाची संधी उद्धव ठाकरे यांना मिळाली तर, शरद पवार पाठिंबा देतील, असे वक्तव्य संजय राऊत यांनी सांगलीमध्ये पत्रकारासोबत बोलताना केले.राउतांच्या या वक्तव्यानंतर आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी संजय राउतांवर थेट निशाणा साधला आहे. “संजय राऊत रोज आपलं वक्तव्य बदलतात. त्यामुळे संजय राउतांच्या वक्तव्याला फार काही महत्व देऊ नका. कालपर्यंत राहुल गांधींना पंतप्रधान बनवायला निघाले होते. आज आता त्यांन उद्धव ठाकरे दिसत आहेत. यामुळे त्यांच्या या पद्धतीच्या वक्तव्याकडे फार काही लक्ष देऊ नका आणि संजय राउतांनीही अशा पद्धतीचे वक्तव्य करू नये.”www.konkantoday.com