विशाळगडावर झालेली घटना म्हणज जिल्हा प्रशासन आणि पोलिसांचे अपयश- खासदार शाहू महाराज

विशाळगडावर झालेल्या हिंचारानंतर आता खासदार शाहू महाराज मैदानात उतरले असून नुकसानग्रस्त झालेल्यांना तातडीने भरपाई देण्यात यावी अशी मागणी त्यांनी राज्य सरकारकडे केलीय. विशाळगडावर झालेली घटना म्हणज जिल्हा प्रशासन आणि पोलिसांचे अपयश असल्याचं त्यांनी सांगितलंय.तसेच संभाजीराजेंनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेनंतर जो हिंसाचार झाला त्याचा तीव्र शब्दात खासदार शाहू महाराजांनी निषेध व्यक्त केलाय.शाहू महाराज यांनी जाहिर पत्रक काढून विशाळगडावर झालेल्या प्रकाराबाबत निषेध व्यक्त केला आहे. त्यात त्यांनी असं म्हटलंय की, विशाळगड येथील अतिक्रमणे हटवण्याच्या निमित्ताने झालेला हिंसाचार आमच्या मनाला प्रचंड वेदना देणारा असून घडलेल्या घटनेचा आम्ही तीव्र निषेध करतो. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या विचाराने प्रगल्भ असलेल्या कोल्हापुर जिल्ह्यात अशी घटना घडली हे अत्यंत क्लेशदायक आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button