महाविकास आघाडीने मिळून जयंत पाटील यांना बळीचा बकरा बनवलं- मंत्री उदय सामंत यांचा हल्लाबोल

जयंत पाटील यांच्या पराभवावरून शिवसेना शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी ठाकरे गटासह महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला आहे. ‘शेकापचे जयंत पाटील यांना डोळ्यांसमोर दिसत होतं की ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेसचे मते फुटणार आहेत. पण महाविकास आघाडीने मिळून जयंत पाटील यांना बळीचा बकरा बनवलं’, असा हल्लाबोल उदय सामंत यांनी केलाकेंद्रात मोठा भूकंप होईल आणि सत्ता परिवर्तन होईल’, असं विधान आदित्य ठाकरे यांनी काल केलं. त्यांच्या या विधानावर उदय सामंत म्हणाले, “दोन वर्षांपासून ठाकरे गटाचे नेते म्हणत होते की महाराष्ट्रामध्ये सत्ता परिवर्तन होईल. मात्र, तसं झालं नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आगामी निवडणुकीला सामोरं जात आहोत. पुन्हा एकदा महायुतीचं सरकार राज्यात येईल. त्यामुळे विरोधकांची विधानं ही फक्त कार्यकर्त्यांना धीर देण्यासाठी असतात”, अशी टीका उदय सामंत यांनी केली.उदय सामंत पुढे म्हणाले, “विधानसभेच्या निवडणुकीसाठी अजून दोन ते तीन महिने बाकी आहेत. त्यामुळे अनेक गोष्टी पाहायला मिळतील. विधानपरिषदेच्या निवडणुकीत ज्या-ज्या गोष्टी घडलेल्या आहेत. त्या देखील सर्वांच्या समोरयेतील. महायुतीला कोणी-कोणी मतदान केलं. याचे पडसादही या निवडणुकीमध्ये उमटतील असेही ते म्हणाले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button