
रत्नागिरी शहरातील मुरूगवाडा येथे विहिरीत बुडून १३ वर्षीय मुलाचा मृत्यू
रत्नागिरी शहरातील मुरूगवाडा येथे १३ वर्षीय मुलाचा विहिरीत बुडून मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारस घडली. आसिफ लतीफ शेख (१३, रा. मुरूगवाडा, रत्नागिरी) असे मृत मुलाचे नाव आहे. या घटनेची नोंद रत्नागिरी शहर पोलिसांत करण्यात आली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार १२ जुलै २०२४ रोजी सकाळी आसिफ याचा मृतदेह विहिरीत बुडालेल्या स्थितीत आढळून आला. खेळताना तो विहिरीत पडला असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. याप्रकरणी शहर पोलिसांकडून घटनेची नोंद करण्यात आली आहे. तसेच पुढील तपास रत्नागिरी शहर पोलिसांकडून करण्यात येत आहे.www.konkantoday.com