कोणालाही सोडणार नाही. ज्यांनी आमची वाट लावण्याचा प्रयत्न केला त्यांची वाट लावणार -निलेश राणे
खासदार राणे साहेबांनी दिल्ली सांभाळावी, रत्नागिरी-सिंधुदुर्ग सांभाळायला आता निलेश राणे सक्षम आहेत. राणे कोणाचाच हिशोब अपुरा ठेवत नाही, प्रत्येकाचा हिशोब चुकता केला जाईल, याची सुरूवात चिपळूणपासून केली आहे. राजापूरच्या टोकापर्यंत जाणार, कोणालाही सोडणार नाही. ज्यांनी आमची वाट लावण्याचा प्रयत्न केला त्यांची वाट निलेश राणे शंभर टक्के लावेल असे सांगत रत्नागिरी इंजिन नसलेल्या बीएमडब्ल्युसारखी आहे. बाहेरून टकाटक दिसते, परंतु आत इंजिनच नाही अशी अवस्था आहे. आतमध्ये इंजिन टाकण्याचे काम केवळ राणेच करू शकतात असे सांगत तुमच्या विरोधात कोणाचा फोन आला तर दुसरा खासदार नारायण राणेंचा असेल. आता कोणी घाबरून जाण्याचे कारण नाही, अशा शब्दात माजी खासदार निलेश राणे यांनी लोकसभा निवडणुकीत विरोधात काम करणाऱ्यांना खडेबोल सुनावले आहेत त्यामुळे निलेश राणे नेमकी कोणाकोणाची वाट लावतात हे पुढील काही कळत स्पष्ट होणार आहे