
रत्नागिरीत शासकीय इंजिनिअरिंग कॉलेज पुढील वर्षीपासून सुरू होणार- उच्च तंत्र शिक्षण मंत्री नामदार उदय सामंत
रत्नागिरीतील तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ योजनेच्या धर्तीवर बदल केले जाणार असून विद्यार्थ्यांना नजरेसमोर ठेवून नूतनीकरण हाती घेतले जाणार आहे. यासाठी सुमारे 25 कोटी रुपये देण्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले. इंजिनिअरिंग कॉलेज पुढील वर्षीपासून सुरू होणार असून तत्पूर्वी सुधारणा अपेक्षित असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
रत्नागिरीतील तंत्रनिकेतन महाविद्यालयाला भेट देऊन ना. सामंत यांनी येथील परिस्थिती जाणून घेतली. यावेळी महाविद्यालयाच्या वतीने परिसरात भविष्यात केल्या जाणार्या बदलांचे प्रेझेंटेशन केले.
सेंटर ऑफ एक्सलन्सच्या धर्तीवर या महाविद्यालयात बदल करण्यात यावेत, यासाठी 25 कोटींचा निधी देण्याची तयारी त्यांनी दर्शवली. पहिल्या टप्प्यात साडेबारा कोटी देण्यात येतील व उर्वरित नंतर त्याप्रमाणे प्लॅनिंग करण्याच्या सूचनाही ना. सामंत यांनी दिल्या.
www.konkantoday.com