
रत्नागिरी जिल्ह्यातील उघड्या चिरेखाणी दिवसेंदिवस बनत चालल्यात धोकादायक
रत्नागिरी जिल्ह्यातील उघड्या चिरेखाणी या नागरिक तसेच प्राण्यांसाठी जीवघेण्या ठरत आहेत. सध्या या चिरेखाणी पावसाच्या पाण्याने भरल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या खोलीचा अंदाज येत नाही. या चिरेखाणीच्या भोवती संरक्षक कुंपण नसल्याने जनावरे व नागरिकांसाठी या खाणी धोकादायक असून संबंधित विभाग मात्र डोळेझाक करीत आहे.जिल्ह्यात विशेषतः रत्नागिरी, संगमेश्वर, देवरूख, गुहागर, राजापूर या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर चिरेखाण व्यवसाय सुरू आहे. गेल्या अनेक वर्षापासून हा बेकायदेशीर व्यवसाय सुरू असताना त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली जात नाही. त्यामुळे दिवसेंदिवस हा व्यवसाय नागरिकांसाठीही धोक्याचा ठरत असून तो बंद करावा, अशी मागणी वारंवार करण्यात आली. मात्र त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जात आहे.www.konkantoday.com