
बाधितांचे पंचनामे वेळेत करण्यासाठी जिल्हा कृषी अधिक्षक कार्यालयात विमा प्रतिनिधींसाठी वेगळा कक्ष
रत्नागिरी जिल्ह्यातील नदिकिनारी भागात पुरामुळे भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे. चिपळूण, खेड, गुहागरसह रत्नागिरीतील गावांमध्ये नेटवर्क नस्याने नुकसान झालेल्या बाधितांचा संपर्क होत नाही. त्यांच्यासाठी ऑफलाईन सुविधा विमा कंपनीच्या प्रतिनिधींनी दिली आहे. रत्नागिरीत वेगळे कार्यालय नाही, मात्र जिल्हा कृषी अधिक्षक कार्यालयात विमा प्रतिनिधींसाठी वेगळा कक्ष सुरू करून दिला आहे.
पूर ओसरला असला तरीही संपर्क यंत्रणा कोलमडलेलीच आहे. जिल्ह्यात पिकविमा कार्यालय स्वतंत्र नाही. जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयात वेगळा कक्ष उभारण्यात आला आहे. नऊ तालुक्यात प्रत्येकी एक प्रतिनिधी नेमण्यात आला आहे.
www.konkantoday.com