
नदीपात्रातील गाळ उपसणीला सुरूवात, अर्जुना, कोदवली नदीपात्रातील गाळ उपसला जाणार
राजापूर तालुक्यातील अर्जुना नदीपात्रात दीड लाख घन क्युबिक मीटर गाळ शिल्लक असून या गाळ उपशाला काही दिवसांपूर्वी पुन्हा सुरूवात करण्यात आली आहे. त्यामुळे शहरवासियांतून समाधान व्यक्त होत आहे.शहराला भेडसावणार्या पुराच्या समस्येवर मात करण्यासाठी गतवर्षी नाम फाऊंडेशनच्या सहकार्याने नगरपरिषद व महसूल प्रशासनाने लोकसहभागातून राजापूर शहरातील अर्जुना व कोदवली नदीपात्रातील गाळ उपसा केल्याने पुराच्या समस्येपासून काहीसा दिलासा मिळाला होता. www.konkantoday.com