
राज्यात तीन ते चार दिवस जोरदार पावसाची शक्यता
संपूर्ण राज्यात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज
हवामान विभागाने व्यक्त केला आहे. यानुसार काही भागात पावसाने हजेरी लावली आहे. मुंबईतही शुक्रवारी मध्यम स्वरुपाचा पाऊस पडला. दरम्यान, मुंबईसह ठाणे भागात शनिवारी अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.तसेच राज्यातील इतर भागातही पुढील तीन ते चार दिवस जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या वाटचालीसाठी सध्या पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे येत्या एक दोन दिवसांत मोसमी वारे वाटचाल करतील. या कालावधीत राज्यात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.