रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा करणार्‍या पानवल धरणाचा २० कोटींचा दुरूस्ती प्रस्ताव १० महिने पडून

रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा करणार्‍या पानवल बंधार्‍याचे सर्वसमावेशक दुरूस्ती काम करण्यासाठी २० कोटी रुपयांच्या मागणीचा प्रस्ताव राज्य सरकारच्या नगर विकास विभागाकडे पाठवून देण्यात आला आहे. सप्टेंबर २०२३ मध्ये हा प्रस्ताव पाठवला गेला असला तरी अद्याप सरकारकडून कसलाही प्रतिसाद मिळाला नाही. वेळेवर मंजुरी मिळाली तर येत्या उन्हाळी हंगामात काम हाती घेणे शक्य होईल असे अधिकार्‍यांनी सांगितले.रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी पानवल धरण बर्‍याच वर्षापूर्वी बांधण्यात आले. गळती मोठ्या प्रमाणात साचलेला गाळ लात घेता या धरणातून अपेक्षित असलेले प्रतीदिवशी २२ एमएलडी एवढे पाणी रत्नागिरी शहराला मिळणे अवघड ठरेल. सध्या धरणात मोठ्या प्रमाणात गाळ साचला असून बंधार्‍याला गळती लागली आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button