रत्नागिरीचे लाचलुचपतचे उपअधीक्षक सुशांत चव्हाण यांची कोल्हापूर येथे बदली

रत्नागिरी लाचलुचपत विभागाचे उपअधीक्षक सुशांत चव्हाण यांची कोल्हापूर येथे बदली करण्यात आली आहे. चव्हाण हे मागील तीन वर्षापासून रत्नागिरीत कार्यरत होते. त्यांच्या काळात लाचलुचपत विभागाकडून सापळे रचून कारवाई करण्यात आली. विशेष म्हणजे बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी शिवसेना आमदार राजन साळवी व वैभव नाईक यांची देखील चौकशी चव्हाण यांनी केली होती. सुशांत चव्हाण हे लाचलुचपतचे अधिकारी होण्यापूर्वी देखील रत्नागिरी जिल्ह्यात कार्यरत होते. जैतापूर आंदोलनावेळी त्यांनी महत्वाची भूमिका पार पाडली होती. तसेच लाचलुचपत विभागाचे कार्यक्षम अधिकारी म्हणून त्यांनी ठसा उमटवला. नुकतेच राज्य शासनाकडून राज्यातील पोलीस निरीक्षकांच्या बदल्या केल्या. यामध्ये चव्हाण यांच्या नावाचा समावेश करण्यात आला. लवकरच ते कोल्हापूर येथे रूजू होणार असल्याचे सांगण्यात आले.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button