कोकण रेल्वे विलिनीकरणावर आमदार शेखर निकम यांची पावसाळी अधिवेशनात लक्षवेधी

कोकण रेल्वेला २५ वर्ष पूर्ण झाली. मात्र अद्यापही कोकणवासियांच्या समस्या जैसे थे आहेत. कोकण रेल्वेचा कारभार स्वतंत्र असून देखील मिळणार्‍या नफ्यावर रेल्वे महामंडळाने कोकणामध्ये पायाभूत सुविधांच्या वाढीसाठी कोणतीही लक्षणीय कामगिरी केलेली नाही. त्यामुळे कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेमध्ये विलिनीकरण होण्यासाठी राज्य शासनाचे कोकण रेल्वेतील समभाग केंद्र शासनाकडे हस्तांतरित करण्यासाठी राज्य विधिमंडळात ठराव संमत करावा, अशी मागणी आमदार शेखर निकम यांनी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याकडे करताना पावसाळी अधिवेशनात लक्षवेधीही केली आहे.याबाबत दिलेल्या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, कोकणातील रेल्वे गाड्यांची क्षमता दुप्पट करणे आवश्यक असल्याने रेल्वे मार्ग दुहेरीकरणासाठी पुरेशी जागा रेल्वे प्रशासनाकडे उपलब्ध असतानाही त्याकडे प्रशासनाने लक्ष केंद्रीत केले नाही. स्थानकांमध्ये दिल्या जाणार्‍या सुविधा, नवीन स्थानके बांधणे यासारखी अनेक कामे प्रलंबित आहेत. केंद्रीय अर्थसंकल्पात कोकण रेल्वेचा विचार केला जात नसल्याने पायाभूत सुविधांच्या विकास कामांना खीळ बसली आहे. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button