
शासनाच्या नवीन निर्णयाचा दोन सत्रात भरणार्या शाळांपुढे अडसर
चालू शैक्षणिक वर्ष सन २०२४-२५ पासून राज्यातील पूर्व प्राथमिक ते इयत्ता चौथीपर्यंतच्या सर्व शाळा सकाळी ९ नंतर भरवाव्यात, याबाबतचा अध्यादेश शासनाने फेब्रुवारी २०१३ मध्ये काढला होता. त्यानुसार यापासून काही शाळांनी वेळ बदललेली असली तरी दोन सत्रात भरणार्या शाळांपुढे वेळ बदलणे गैरसोयीचे ठरत आहे. तर काही शाळांनी पूर्वीच्या वेळेप्रमाणेच शाळा भरविण्याचा निर्णय घेतला आहे.नव्या शैक्षणिक वर्षाला १५ जूनपासून सुरूवात झाली आहे. सकाळी मुलांची झोप पूर्ण होत नाही. त्यामुळे मुलांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याच्या तक्रारी पालक वर्गातून करण्यात येत होत्या. यासाठी सकाळ सत्रातील शाळा ९ वाजल्यानंतर भरवाव्यात, अशी मागणी करण्यात आली होती. त्यामुळे शासनाने देखील प्राथमिक शाळांची वेळ ८ वाजता करावी, असे आदेश दिले आहेत.या निर्णयामुळे काही पालक व विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला असला तरी या निर्णयाची अंमलबजावणी करताना काही शाळा, पालक, विद्यार्थी तसेच बस वाहतूक करणारे यांच्या काही अडचणी उभ्या आहेत.www.konkantoday.com