महाआघाडीतील दोन्ही पक्षांमुळे आमचे नुकसान झाले-खासदार संजय राऊत

लोकसभा निवडणुकीत शरद पवार गट आणि काँग्रेससाठी आम्ही प्रचार केला मात्र सांगलीसह अनेक ठिकाणी आमच्या उमेदवाराच्याविरोधातच काम केले.महाआघाडीतील दोन्ही पक्षांमुळे आमचे नुकसान झाले अन्यथा अधिक जागा जिंकल्या असत्या असा आरोप उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.पत्रपरिषदेला संबोधित करताना ते म्हणाले, सांगलीतील जागेवर काँग्रेस-शरद पवार गटाने आमच्यासाठी कामच केले नाही. एका बाजूने सत्ताधारी आमची कोंडी करायचे तर दुसरीकडे आघाडीतील पक्षाचे नेत्यांच्या कुरघोड्या सुरू होत्या. अशा परिस्थितीतही 9 जागांवर पक्षाचे खासदार विजयी झाले. ठाणे, कल्याण डोंबिवलीत संपूर्ण शासकीय यंत्रणा आमच्याविरोधात काम करत होती. केंद्राकडून सर्वात जास्त टार्गेट आम्हाला करण्यात आले होते. त्याचा फटका आम्हाला बसला. विधानसभा निवडणुकीत असा प्रकार होऊ नये यासाठी काळजी घेण्यासंदर्भातदोन्ही पक्षांशी चर्चा करणार असल्याचे ते म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button