
माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर पाणी प्रश्नावरून आक्रमक शहरवासीयांना 24 तास पाणी देण्याची मागणी
माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर हे शहरातील नळ पाणी योजनेवरून व पाणी प्रश्नावरून आक्रमक झाले आहेत याबाबत त्यांनी मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देऊन रत्नागिरी शहराला दरारोज 24 तास सुधारीत नळपाणी योजनेद्वारे पाणी पुरवठा करण्याबाबतची मागणी केली आहे माजी नगराध्यक्ष मिलींद किर व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे शहराध्यक्ष निलेश भोसले यांनी याबाबतचे निवेदन मुख्याधिकारी, रत्नागिरी नगर परिषद यांना दिले आहे त्यांनी दिलेल्या निवेदना नमूद करण्यात आले आहे की, रत्नागिरी शहरामध्ये सुधारीत नळपाणी योजना राबवण्यात आली आहे. ही नळपाणी योजना ही सन 2016 मध्ये मंजूर झाली मात्र ती टेंडर होवून वर्क ऑर्डर देण्यासाठी सन 2017 उजाडले. सन 2016 ते 2024 अशी सुमारे 8 वर्षे झाली मात्र अजूनही नळपाणी योजना अपूर्ण आहे. ही दुर्दैवी बाब आहे. ही योजना पूर्ण करण्याचा कालावधी दोन वर्षे असताना कॉन्ट्रक्टर चे लाड पुरवण्याचे काम नगर परिषद प्रशासन आणि सत्ताधार्यांनी केले हे सर्व नागरीकांना माहितच आहे. म्हणून लोकांना आज एक दिवस आड पाणी देण्याचे नियोजन करावे लागले. गेली काही वर्षे लोकांना पाणी बाणी प्रश्नाला सामोरे जावे लागत आहे.सत्ताधार्यांनी व प्रशासनाने तोच कॉन्ट्रक्टर नेमायचे हे ठरवले होते म्हणून आज नगर पालिकेची सुधारीत नळपाणी योजना निकृष्ट दर्जाची झाली आहे. तरी सदर कामापैकी पानवल धरण ते नाचणे फिल्टर प्लांट, शिळ धरण ते जॅकवेल पाईप लाईन ही कामे झाली नाहीत.पानवल ते नाचणे फिल्टर हाऊस पर्यंतची 1300 मीटरची पाईप लाईन अद्याप जोडली न गेल्यामुळे या पुढील वर्षीही लोकांना पाणी पाणी करण्याची वेळ नगर पालिका प्रशासन आणि राज्याचे सत्ताधारी पुन्हा आणणार आहे. गेल्या 8 वर्षात 1300 मीटर लाईनची तरतुद आपण प्रशासक म्हणून केली नाही. ही योजना 24* 7 (24 तास दररोज) जनतेला पाणी देण्याचे नियोजन केलेले असताना लोकांना अद्याप 24 तास पाणी देण्यात आले नाही ही दुर्दैवी बाब आहे. गेल्या वर्षीही माझी मागणी होती मी तसे निवेदनही आपणास दिलेले आहे असेही कीर यांनी निवेदनात म्हटले आहे