
राजापूरच्या महिला नायब तहसिलदारांविरोधात माजी आमदार हुस्नबानू खलिफे यांची तक्रार
राजापूर तहसिलदार कार्यालयातील नायब तहसिलदार दीपाली पंडित या आपल्या नायब तहसिलदार या पदाचा स्थानिक रहिवासी म्हणून गैरवापर करीत आहेत. कार्यालयीन कामाकरिता येणार्या लोकांशी त्यांचे वर्तन अतिशय उद्धट पद्धतीचे आहे. शिवाय कार्यालयांतर्गत कर्मचार्यांशी त्यांचे नेहमीच वाद होत असल्याचे दिसून येत आहे. त्याचा नाहक फटका कामकाजासाठी येणार्या जनतेला बसत आहे. म्हणूनच या सर्व कारणांमुळे नायब तहसिलदार श्रीमती पंडीत यांची तत्काळ अन्यत्र बदली करण्यात यावी व जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी विधान परिषद माजी सदस्या हुस्नबानू खलिफे यांनी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांच्याकडे समक्ष केली आहे
www.konkantoday.com.