
रत्नागिरी गुडस शेड येथे पाचशेच्या रेकला सोमवारी हिरवा कंदील
जयगड जिंदल पोर्ट आणि नर्मदा बायोटेक खत कंपनीच्या संयुक्त विद्यमाने कोकण रेल्वेच्या रत्नागिरी रेल्वे स्टेशन रेक पॉईंट गुडसवरून पाचशे खतांच्या मालगाड्या गेल्याच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी गुडस शेड येथे पाचशेच्या रेकला सोमवारी १७ जून हिरवा कंदील दाखवण्यात आला.यावेळी बालताना जिंदल जयगड पोर्टचे युनिट प्रमुग उपाध्यक्ष करूण कांतदवे म्हणाले, कोकण रेल्वेच्या माध्यमातून रेल्वे स्टेशनवरून ५०० मालगाडी जाणे हा मैलाचा दगड ठरला आहे. जयगड पोर्टच्या बंदराची वर्षभरात ५००० मालगाड्या जातील एवढी क्षमता आहे. कोकण रेल्वे आयात निर्यात व्यापार वृद्धीसाठी आणि शेतकर्यांना मोठे वरदान असल्याचे ते म्हणाले. www.konkantoday.com