जिल्ह्यातील चार-चार मंत्री सरकारमध्ये असतानाही यांना लोकांवर का दबाव आणावा लागला ? याचे आत्मपरीक्षण त्यांनी करावे-वैभव नाईक

भाजप आमदार नितेश राणेंनी अनेक वेळा चॅलेंज केले आहे. मात्र, उद्धव ठाकरे लवकरच विधानसभेचे रणशिंग फुंकणार आहेत आणि त्यावेळी ते कोकणात येतील तेव्हा हिंमत असेल तर त्यांना अडवून दाखवा,” असे आव्हान शिवसेनेचे ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी दिले.कुडाळ येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत वैभव नाईक ते बोलत होते. यावेळी त्यांनी भाजप आणि लोकसभा निवडणुकीत झालेल्या अनेक घडामोडींवरही भाष्य केले आहे.वैभव नाईक म्हणाले, लोकसभा निवडणुकीत आमचा झालेला पराभव आम्हाला मान्य आहे. मी विनायक राऊत यांची माफी मागितली, कारण एक शिवसैनिक म्हणून निवडणुकीच्या शेवटच्या दोन-तीन दिवसात राणेंच्या कार्यकर्त्यांकडून जो प्रकार मतदारसंघात चालू होता तो आम्ही रोखू शकलो नाही. त्यामुळे विनायक राऊत यांची माफी मागितली.नारायण राणेंच्या कार्यकर्त्यांनी लोकांच्या घराघरात जाऊन त्यांच्यावर दबाव आणला. या प्रकाराचे अनेक व्हीडिओ सुद्धा समोर आले आहेत. त्यामुळे या जिल्ह्यातील चार-चार मंत्री सरकारमध्येअसतानाही यांना लोकांवर का दबाव आणावा लागला ? याचे आत्मपरीक्षण त्यांनी करावे आणि लोकांची माफी मागावी, असे टोलाही नाईक यांनी लगावला.लोकसभा निवडणुकीत राणेंनी पैसे वाटून ते निवडून आले असा आरोप संजय राऊत यांनी केला होता. त्याला प्रत्युत्तर देताना आमदार नितेश राणे यांनी कोकणातील जनतेची माफी मागितली नाही तर उद्धव ठाकरेंना कोकणात पाऊल ठेऊ देणार नाही, असा इशारा दिला होता. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button