कडक उन्हाळ्यामुळे आवक घटल्याने भाज्यांचे दर कडाडले
यंदाच्या कडक उन्हाळ्यामुळे पाण्याचे निर्माण झालेले कमालीचे दुर्भिक्ष्य, तसेच अवकाळी पाऊस व १ जूनपासून सुरू झालेली मासेमारी बंदी या महत्वाच्या कारणामुळे जिल्ह्यातील भाज्यांचे दर गगनाला भिडले आहेत. आणखी एक महिनाभर ही परिस्थिती जैसे थे राहणार आहे. यामुळे सामान्यांच्या खिशाला मात्र चांगलीच कात्री लागणार असून गृहिणींचे आर्थिक गणित बिघडणार आहे. तसेच चिकननेही उच्चांक गाठल्याने खवय्यांच्या खिशाला चाट बसत आहे. www.konkantoday.com