रत्नागिरी एमआयडीसीमध्ये आरजू टेकसोलने केलेल्या फसवणुकीचा आकडा पाच कोटीच्या वर

रत्नागिरी एमआयडीसीमध्ये आरजू टेकसोल कंपनी स्थापन करून कच्चा माल देतो, पक्का माल तयार करून द्या अशी जाहिरात करत या कंपनीने असंख्य लोकांची फसवणूक केली. कच्चा माल देतो, पक्का माल करून द्या असे सांगताना या कंपनीने गुंतवणूक गोळा करायला सुरुवात केली. त्यावर परतावा देण्याचे आश्वासन दिले. परताव्याच्या आमिषाला अनेकजण बळी पडले. आतापर्यंत पोलीसांनी475 गुंतवणूकदारांचे जबाब घेतले आहेत. या गुंतवणूकदारांनी तब्बल 5 कोटी 39 लाख 57 हजार 455 रुपयांची गुंतवणूक केली आहे. अजूनही काही गुंतवणूकदार आहेत, ते अजून पोलीसांपर्यंत पोहोचलेले नाहीत. आरजू टेकसोलने आपले कार्यक्षेत्र सिंधुदुर्ग, सांगली आणि दिल्लीपर्यंत वाढवले होते. सिंधुदुर्गमध्येही मोठ्या प्रमाणात फसवणूक झाल्याची शक्यता आहे. आरजू टेकसोल प्रायव्हेट लिमिटेडने तब्बल140 कर्मचाऱ्यांना कामावर ठेवले होते. त्यापैकी 30कर्मचाऱ्यांचा पोलीसांनी जबाब घेतला आहे. पुढील काही दिवसांत अन्य काही कर्मचाऱ्यांचा जबाब घेतला जाणार आहे. शेवटचे काही महिने कर्मचाऱ्यांचा पगार न झाल्याची माहिती पुढे येत आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button