लांजा तालुक्यातील वेरवली बेर्डेवाडी येथील धबधब्याखाली तरुणाचा बुडून मृत्यू

पावसाळा सुरू झाल्यानंतर धबधब्यावर जाताना जिल्हा प्रशासनाने दक्षता घेण्याचे आदेश देऊन देखील पावसाळ्याच्या सुरुवातीला धबधब्यात बुडून मृत्यू पडण्याचा प्रकार घडला आहेलांजा तालुक्यातील वेरवली बेर्डेवाडी येथील धबधब्याखाली कळसवली राजापूर येथील एक तरुण बुडून मृत्यू झाल्याची घटना काल दुपारी 2 च्या दरम्यान घडली. प्रथमेश दत्ताराम तळेकर, (26, राहणार कळसवली ता. राजापूर) हा तरूण मृत झाला आहे. कळसवली राजापूर येथील 7-8 तरुण मुंबईहून गावी आले होते आज ही तरुण मंडळी वेरवली बेर्डेवाडी धरणाच्या धबधब्याजवळ अंघोळ करत होते. धबधब्यात आंघोळ करताना एकजण पाय घसरून बुडाला. उशिरापर्यंत पाण्यातून वरती न आल्याने इतर तरुणांची धावपळ झाली. सुमारे दोन तासांनी मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळला. वेरिवली बेर्डे वाडी धरणाचे वाढीव पाणी सांडव्यातून सोडण्यात आल्याने धबधबा कार्यान्वित झालेला आहे. हा धबधबा अतिशय धोकादायक आहे या धधबधब्याकडे न जाण्याचे मनाई आदेश आहेत. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button