
*वक्त आने दो …जबाब भी देंगे और हिसाब भी लेंगे’ , उदय सामंत व किरण सामंत यांच्या फोटो लावलेल्या बॅनर मुळे कणकवलीत खळबळ
लोकसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले नंतर आता अनेक ठिकाणी आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून नारायण राणे हे विजयी झाल्यानंतर माजी खासदार निलेश राणे यांनी किरण सामंत यांनी काम केले नसल्याचा आरोप केला होता त्यानंतर पालकमंत्री उदय सांमत यांच्या मतदारसंघातही मताधिक्क्य कमी मिळाल्याचा दावा करण्यात आला होता मात्र यावर पालकमंत्री उदय सामंत यांनी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला होता हा विषय आमचा घरातला असून आम्ही तो घरातच मिटवू असे त्यांनी सांगितले होते .कोकणातील राजकीय नाट्यानं कायमच संपूर्ण राज्याचं लक्ष वेधलेलं असताना आता इथूनच एका बॅनर मुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. ‘वक्त आने दो …जबाब भी देंगे और हिसाब भी लेंगे’ अशा आशयाचे बॅनर कणकवलीत लागले असून, या बॅनरवर उदय सामंत आणि किरण सामंत यांचा फोटो पाहायला मिळत आहे. कणकवली शिवसेना शाखेबाहेर लागलेला हा बॅनर नेमका कोणाला इशारा देण्यासाठी आहे, याचसंदर्भातील उलट सुलट चर्चा सध्या या भागामध्ये सुरु आहेत. सध्या या बॅनरची चर्चा असून, तो लावण्यामागचा हेतू काय? यासंदर्भातील कयास लावण्याचा प्रयत्न अनेकजण करताना दिसत आहेत.www.konkantoday.com