ग्रामपंचायतींच्या अधिकार्‍यांवर गदा नको, सरपंच संघटनेच्या बैठकीत निर्णय

ग्रामपंचायतींना आवश्यक असणार्‍या बाबी, साहित्य आणि विकास कामांबाबत निर्णय घेण्यास अधिकार ग्रामपंचायतींना आहेत. शासकीय नियमानुसार त्याचे पालन केले जात आहे. परंतु ग्रामपंचायतीच्या अधिकारावर पंचायत समितीच्या अधिकार्‍यांनी गदा आणू नये, दबाव तंत्राचा वापर करू नये, असा निर्णय सरपंच संघटनेच्या बैठकीत घेण्यात आला.सरपंच संघटना आणि ग्रामपंचायतीच्या मागण्यांबाबत २४ जून रोजी मंत्रालयात ग्रामविकास मंत्र्यांची भेट घेण्याचे ठरवण्यात आले. तर बैठकीचे शिवस्वराज्य प्रतिमा खरेदीचा विषय चांगलाच गाजला.चिपळूण तालुका सरपंच संघटनेची बैठक गुरूवारी पंचायत समितीत झाली. या बैठकीला तालुक्यातील सरपंच बांधवांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. नुकताच तालुक्यात स्वराज्य प्रतिमा खरेदी विशय जोरदार गाजत होता. त्यामुळे सरपंच संघटनेच्या बैठकीत याबाबत कोणता निर्णय होतो, याकडे ग्रामपंचायत पदाधिकार्‍यांचे लक्ष लागले होते. तालुक्यात अनेक सरपंचानी पंचायत समित्यांच्या निर्णयावर जाहीर नाराजी व्यक्त केली. ग्रामपंचायतींना आवश्यक साहित्य आणि विकास कामे कोणाकडून करून घ्यावीत, याबाबतचे अधिकार शासनानेच ग्रामपंचायतींना दिले आहेत. त्यामुळे पंचायत समितीच्या अधिकार्‍यांनी ग्रामपंचायतींच्या कारभारात हस्तक्षेप करू नयेत, त्यांनी आवश्यक ते नियमानुसार मार्गदर्शन करावे. त्याचे पालन केले जाईल असे ठरवण्यात आले. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button