
निसर्ग चक्रीवादळग्रस्तांच्या मदतीवरुन रायगड जिल्ह्यात शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये उभा वाद निर्माण झाला आहे. सरकार आणि सामाजिक संस्थांकडून आलेली मदत फक्त राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्येच वाटली जाते, असा आरोप थेट शिवसेनेने केला आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल नवगडे यांनी हा आरोप केला आहे.
पालकमंत्री आदिती तटकरे यांनी दिलेल्या आदेशानुसार सरकारी अधिकारीही मदत वाटताना पक्षपाती पणा करत आहेत, असा आरोपही शिवसेनेने केला आहे.
www.konkantoday.com