
गडगडी धरणाचे काम पूर्णत्वास गेले असले, तरीही आजुबाजूच्या गावातील ग्रामस्थांचा पाणी प्रश्न मात्र कायम
शेतकर्यांसाठी शेतीसाठी बारमाही पाणी उपलब्ध व्हावे, या उद्देशाने हाती घेतलेला संगमेश्वर तालुक्यातील गडगडी धरण प्रकल्प ५२ वर्षानंतरही अपूर्ण आहे. गडगडी धरणाचे काम पूर्णत्वास गेले असले, तरीही आजुबाजूच्या गावातील ग्रामस्थांचा पाणी प्रश्न मात्र कायम आहे. धरण उशाला आणि कोरड घशाला अशी स्थिती धरण परिसरातील तेरा गावांची झाली आहे.संगमेश्वर तालुक्यातील गडगडी प्रकल्पाला कोट्यवधींचा खर्च करण्यात आला आहे. २ कोटी ८७ लाखाचा हा प्रकल्प गेल्या ५२ वर्षात १५३ कोटी ११२ लाखांवर पोहोचला आहे. गेली ५२ वर्षे कोट्यवधींचा खर्च करूनही प्रकल्पाचे काम अपूर्ण आहे. कालवे अपूर्ण असल्याने या कालव्याच्या कामाला अजून लाखोंचा खर्च अपेक्षित आहे. वर्षागणिक खर्चात वाढ होत आहे. कोटींच्या कोटी उड्डाणे झाली असून पाण्याच्या एका थेंबाचाही उपयोग ग्रामस्थांना झालेला नाही. परंतु याकडे स्थानिक आमदारांसह सर्वच लोकप्रतिनिधीनी दुर्लक्ष केले आहे. www.konkantoday.com