
अतिक्रमणामुळे चिपळूण पानगल्लीतील नालाच झालाय गायब
चिपळूण शहरातील पानगल्लीतील मुख्य नालाच गायब झाला असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यावर अनेकांनी अतिक्रमण केरत बांधकामे केली आहेत. तर काही व्यापार्यांनी गटारे बुजविली आहेत. हा सारा प्रकार सध्या सुरू असलेल्या बाजारपेठेतील गटारांच्या साफसफाईमुळे पुढे येत आहे. त्यामुळे संबंधितांवर नगर परिषद काय कारवाई करते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.गेल्या काही वर्षापासून कमी पाऊस पडला तरी बाजारपेठेत पाणी येत असल्याचे दिसते. त्यामुळे नगर परिषद प्रशासन याची कारणे शोधत असताना बाजारपेठेतील बंद असलेली गटारे हे मुख्य कारण असल्याचे मुख्याधिकारी विशाल भोसले यांच्या लक्षात आले. यामुळे त्यांनी बाजारपेठेची पाहणी करत सर्व गटारांची साफसफाई करण्यासह त्यावर व्यापार्यांनी ठेवलेले कडाप्पे काढून टाकण्याच्या सूचना आरोग्य विभागाला केल्या आहेत. त्यानुसार आरोग्य निरीक्षक महेश जाधव, आरोग्य विभाग प्रमुख वैभव निवाते यांच्या माध्यमातून कार्यवाही सुरू आहे. www.konkantoday.com