
रत्नागिरी जिल्ह्यात डेंग्यूचे रूग्ण वाढले
पावसाळ्याच्या तोंडावर रज्यभरात डेंग्यूचा सर्वत्र प्रादुर्भाव वाढला आहे. यंदा जानेवारी ते ७ मे याा कालावधीत डेंग्यूचे १,७५५ रूग्ण आाढळले आहेत. गेल्या ५ महिन्यात रत्नागिरी जिल्हा आरोग्य विभागाकडे नोंद झालेल्या रूग्णांची संख्या १०० वर गेली असून त्यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.राज्यातही पालघर, कोल्हापूर, अकोला, नांदेड आणि सोलापूर या जिल्ह्यात डेंग्यू रूग्णांचे प्रमाण जास्त असून गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाा रूग्णसंख्याा दीडपट झाली आहे.आरोग्य विभागााने राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जून हा हिवताप प्रतिरोध महिना जाहीर केला आहे. या महिन्यात हिवताप, डेंग्यू, चिकुनगुन्या, हत्तीरोग या आजाराविषयी जनजागृती केली जात आहे. तसेच किटकजन्य आजारांच्या प्रतिबंधासाठी सुक्ष्म कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यानुसार आरोग्य विभागाकडून उपाययोजनांची अंमलबजावणी केली जात आहे. तरीही शहरी भागांसह ग्रामीण भागातही अपुर्या उपाययोजनांमुळे डेंग्यू रूग्णांमध्ये कमालीची वाढ होत असल्याचे दिसत आहे.www.konkantoday.com