चिपळुणात नळाच्या पाण्याला येतोय उग्र वास, नागरिकांची तक्रार
चिपळूण शहरातील मार्कंडी, काविळतळी परिसरात नळाच्या पाण्याला उग्र वास येत असल्याच्या तक्रारी काही नागरिकांनी नगर परिषदेकडे केल्या आहेत. त्याची दखल घेत मुख्याधिकाारी विशाल भोसले यांनी मंगळवारी खेर्डी जलसुद्धीकरण केंद्राची पाहणी केली. तसेच पाण्याचे नमुने तत्काळ तपासणीसाठी रत्नागिरीतील प्रयोगशाळेत पाठवण्याच्या सूचना पाणी विभागाला केलल्या आहेत. www.konkantoday.com